Saturday, April 12, 2008

हल्ली ग्रामीण भागाला नावं ठेवायची सगळ्यांना मुळी सवयच झाली आहे. काय तर म्हणे तुमच्याकडे सारखे लाईट जातात...अरे पण जेव्हा लाईट येतात किंवा अधुन-मधुन असतात तेव्हाच जातिल ना? काहीतरीच आपलं!

आणि राज्यकर्त्यांना कसली हो नावं ठेवताय? ते तर खरे गांधीवादी आहेत. गांधीजींनी म्हंटल होतं ना खेड्याकडे चला, हे म्हणतात खेड्यातुन चला नाहीतर गांधीजींची तत्व आमलात आणा!.... कशी?

चरखा चालवा... तो चालवायला काय वीज लागते?

उकाड्यामधे पुरुषांना त्यांच्यासारखं एकवस्त्र बसता येतं, रात्री लाईट नाही बघतय कोण?

संध्याकाळी समुद्रावरचा नैसर्गिक वारा अनुभवता येतो! मित्रपरिवाराला भेटी देता येतात... कारण TV बघायला वीज नसते.. म्हणुनच आम्ही नाही बाई सिरीअल्सना रटाळ रटाळ म्हणत, आम्ही बघतच नाही!

आम्हाला नाही जिममध्ये जायला लागत, विहीरीचं पाणी ओढतो ना आम्ही..pumpsets आहेत हो पण लाईट असतील तर ते चालतील ना!

आता तर पाटा-वरवंटा पण उपयोगात येऊ लागलाय त्यामुळे टाकी लावणा-या लोकांचा बसत चाललेला धंदा जोरात आलाय.

कदाचित काही वर्षांनी जातं सुद्धा परत वापरु, आहत कुठे?

मग काय रडता लाईट नाहीत. लाईट नाहीत म्हणुन, अहो आता शहरी पाहुण्यांचीही वर्दळ नसते ’very boring rural life'

आम्ही आता अध्यात्माकडे सुद्धा वळायला लागलो आहोत!

"ठेविले ’दिलीपे’ (मा. दिलीप वळसे-पाटील.. मा. म्हणजे माननीय नाही मारावेसे वाटतात ते!)

तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान!

मग पेला अर्धा भरलेला आहे ना?

थांबा हं, मेणबत्ती आणते ते पाहायला!

3 comments:

Anonymous said...

I have come to know about your blog thru your Jaswandi's blog.

chaan vatal ki sagali family aata blogger zali aahe.

keep it up. chaan lihit raha.

मोरपीस said...

बरोब्बर लिहिलयं आपण.

ओंकार घैसास said...

kyaa baat hai!!